शहराच्या दौऱ्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड
ठेकेदारमुळे या पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोये:आ.गणपत गायकवाड़
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण : मोठे नाले सफाईचे हे टेंडर सत्तेत असलेल्यांच्या हातात आहे. आणि त्या मुळे गटर नालेची सफाई वेळी वर होत नाही, मात्र नाल्यांचे तरंगणे नीट खाडीत पडत नाही, त्यामुळे तुबलेल पाणी शहरात शिरते त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.असे शहराच्या दौऱ्यावर गेलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यानी पत्रकारांनी विचारलेले प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले.
या वर्षी 2022 मध्ये मान्सून लवकर येणे अपेक्षित आहे, त्यामुळे ठाण्याला लागून असलेल्या कल्याण डोंबिवली शहरातील गटार नाल्यांच्या सफाईसाठी रु. 3.50 कोटींची तरतूद आहे. त्यात दोन्ही शहरांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली जाते.पण ते होत नाही,असे आमदार यांचा म्हणणे आहे.
आमदार गणपत गायकवाडशहराच्या दौऱ्यावर गेलेले भाजप आमदार गणपत गायकवाड व त्यांचा सोबत,सहा आयुक्त संजय साबडे, हेमा मुम्बरकर ,कविता हिले; सहायक आयुक्त श्री नवंगुर यांनी अचानकपणे मोठ्या गटर ,नाल्यांची दुरवस्था बघून आमदार गायकवाड़ यानी सांगितले की कल्याण शहरातील साफसफाईसाठी जे टेंडर काढले जाते ते सत्ताधाऱ्यांच्या हातात असल्याचा आरोप करत या गटर, नाल्यांची दुरवस्था झाली आहे.गेल्या वर्षीची तुलना करता गायकवाड म्हणाले की, 48 तास सतत पावसामुळे शहरात पावसाचे पाणी तुंबण्याचे पालिकेने सांगितले होते, मात्र अवघ्या दोन तासांच्या पावसात शहर पावसाच्या पाण्यात बुडाले.शहरातील सर्वसामान्य नागरिक घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला होता .
सन 2021 मध्ये, ठाणे जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे, विशेषतः नदीकाठच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात उल्हास, वालधुनी आणि काळू नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली होती, त्यामुळे नद्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले होते, या दरम्यान लाखो लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
कल्याणमधील शहाड, योगी धाम, भवानी नगर, अनुपम नगर, कल्याण-मुरबाड रोड, घोलप नगर असे अनेक भाग वालधुनी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाण्याने 2021 ला भरले होते. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीजवळ असलेले बदलापूर राज्यातील हेंद्रपारा, वालीवली, बॅरेज रोड, रायता, महारळ असे अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. भिवंडीतील काळू नदीलाही उधाण आले असून, नदीकाठावर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले होते. बाधित भागातील स्थानिक लोक गृहनिर्माण वसाहतींमध्ये स्थलांतरित झाले होते, तर तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना त्याच इमारतींच्या वरच्या मजल्यावर राहावे लागले. परिस्थिती पाहता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच जिल्हा प्रशासनाने बचाव कार्यासाठी आपली टीम तैनात केली होती.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा